Breking News
तडीपार असताना कोयत्यासह फिरणाऱ्या सराईताला अटक…३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरेदेशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससामूहिक बलात्कारातील तिसऱ्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्यापुणे : खुनाच्या प्रयत्नात ३ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला बेड्या…पिस्तुल बाळगणाऱ्याला अटक, खंडणी विरोधी पथक दोनची कामगिरीकबुरतराला मारत असताना तृतीयपंथीयाकडून मिस फायर, कोंढाव्यातील घटना…पाचव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुर ठारदहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वनराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रयत्न करावे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

पुणे : ‘साथी हात बधाना’ कार्यक्रमात गुन्हेगारीविरोधात ठाम भूमिका

वैभवी देशमुखच्या प्रगल्भ विचारांना उपस्थितांचा सलाम

Marathinews24.com

पुणे – मस्साजोग येथील सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सामाजिक ऐक्य आणि न्यायाच्या लढ्याचा संदेश देणारा ‘साथी हात बधाना’ हा कार्यक्रम पुण्यात पार पडला. गांधी भवन, कोथरूड येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमात देशमुख कुटुंबीयांची उपस्थिती भावनिक वातावरण निर्माण करणारी होती. कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, ही हत्या सहज घडलेली नाही, यामागे सखोल आणि अचूक प्लॅनिंग आहे. गुन्हेगारांना राजकारणाचे पाठबळ असल्यामुळेच त्यांची अशी ही हिम्मत वाढते.

फर्ग्युसन महाविद्यालयात दहावीनंतरच्या प्रवेशासाठी करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन – सविस्तर बातमी

आयोजक, प्रमोद प्रभुलकर यांनी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला प्रश्न विचारला की, पुढे तू मतदान करायला जाशील, त्यावेळी तुला नवीन कुठल्या पक्षाची अपेक्षा आहे का? तिचे हे उत्तर उपस्थितांना अंतर्मुख करणारे ठरले. सध्या मला तुम्ही न्यायाची अपेक्षा आहे. जे पक्ष जनतेच प्रतिनिधित्व करणार आहेत, त्यांनी नागरिकाच्या गरजा ओळखून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. घर, गाडी, बंगला मिळवण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा आधार न घेता स्वतःच्या मेहनतीवर उभे राहिले पाहिजे अशी ठाम भूमिका वैभवी हिने व्यक्त केली.

या कार्यक्रमात अंजली दमानिया, सकाळचे संपादक सम्राट, फडणीस, ॲड. असीम सरोदे आणि माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे व मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी देशमुख कुटुंबीयांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. या लढ्याला केवळ सहवेदनेने नव्हे, तर कृतीतून साथ देण्याची गरज असल्याचा सूर एकवटला.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top