Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात हैदराबादमधील आयबी अधिकारी ठार

कुटुंबासमोर झाडल्या गोळ्या

marathinews24.com

जम्मू – काश्मीरच्या पहलगममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हल्ल्यात हैदराबादमध्ये कार्यरत इंटेलिजेंस ब्युरो अधिकारी यांच्यावर कुटुंबासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मनीष रंजन असे ठार झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बिहारचा मूळ रहिवासी मनीष रंजन हे कुटुंबासमवेत रजा प्रवासात (एलटीसी) भेट देत होता. इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) मधील सूत्रांच्या प्राथमिक माहितीनुसार, पत्नी आणि मुलांसमोर त्याचा मृत्यू झाला. मनीष रंजनने गेल्या दोन वर्षांपासून इंटेलिजेंस ब्युरोच्या हैदराबाद कार्यालयाच्या मंत्री विभागात काम केले.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठार झालेल्यामध्ये पुण्यातील काही जणांचा समावेश आहे. हल्ल्यात अनेजकण जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात मी निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. असेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top