Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

कायदा-सुव्यवस्थासह प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना आदेश

marathinews24.com

कोल्हापूर – शहरात अलीकडील काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी डॉ. गोऱ्हे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. गोऱ्हे यांनी कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी, नागरिकांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कोल्हापूर महालक्ष्मी देवी दर्शन व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन – सविस्तर बातमी

कोल्हापूर शहरात झालेल्या हल्ले, खून, खुनाचे प्रयत्न व तलवारीने दहशत माजविणाऱ्या घटना ही चिंतेची बाब असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी सर्व आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी ग्रामीण भागातील सुरक्षेवरही लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक वातावरण टिकवण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या तक्रारींवर जलद व प्रभावी प्रतिसाद मिळावा यासाठी भरोसा सेल अधिक व्यापक आणि कार्यक्षम करण्यावर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला. महिलांसोबत ऑनलाईन कनेक्टिव्हिटी वाढवणे, सूचना पेट्यांचा वापर सुयोग्य रीतीने करणे तसेच पोलिसांना लिंगभाव संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांच्यातील समन्वय वाढवावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली. निर्जन रस्त्यांवर गस्त वाढवणे, ग्रामीण भागात रिक्षा नंबर नोंदविण्याबाबत जनजागृती करणे या उपाययोजना तातडीने राबवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. अमली पदार्थांची विक्री, टोळीबाजी, खून व खुनाचे प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया अधिक काटेकोरपणे राबवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. सीसीटीव्ही नेटवर्क अधिक सक्षम करणे, विद्यार्थ्यांची व व्यापाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेणे हे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील पोस्को प्रकरणांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने, या प्रकरणांची सुनावणी लवकरात लवकर व्हावी आणि तारखांचा नियमित पाठपुरावा व्हावा यासाठी विशेष पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोल्हापूर ही ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची नगरी असून, येथे शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणे अस्वीकार्य असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. नागरिकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस व तातडीची कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×