Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

संरक्षित सिंचनामुळेच फलोत्पादनात राज्य अग्रेसर : डॉ. कैलास मोते

गुणवत्तापूर्ण शेततळ्यांमुळे जलसंधारणाला नवे बळ

marathinews24.com

पुणे – देशात शेतमालासह फलोत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा अग्रगण्यवाटा असून, प्रतिकूल परिस्थितीत बारमाही फळबागा टिकविणे हेआव्हानात्मक असते. अशा वेळी शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाच्या सुविधा प्लास्टिक आच्छादनातील शेततळ्यांद्वारे उपलब्ध झाल्याने जलसंधारण आणि फलोत्पादनाला नवे बळ मिळाले आहे. या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून, सामुदायिक व वैयक्तिक शेततळ्यांच्या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच महाराष्ट्राचा देशपातळीवर विशेष उल्लेख होतो, असे मत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे (एनएचएम) माजी संचालक डॉ. कैलास मोते यांनी व्यक्त केले.

पुण्यात पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार – सविस्तर बातमी 

शेततळ्यांची गुणवत्तापूर्ण जोडणी करून त्यांचा टिकाऊपणा वाढविण्याच्या उद्देशाने मिपा इंडस्ट्रीज (मिपाटेक्स) आणि वेल्डी – लिस्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच‘जिओवेल्ड कनेक्ट २०२५’ या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले. यावेळी डॉ. मोते बोलत होते.

मिपाटेक्स, हा मिपा इंडस्ट्रीजचा अग्रगण्य ब्रँड असून पॉलिमर आधारित शेती आणि जल संधारणासाठी आधुनिक उपाय प्रदान करतो. तर वेल्डी– लिस्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. प्लास्टिक वेल्डिंग तंत्रज्ञानातील अचूकता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. दोन्ही संस्थांचे ध्येय गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ शेततळी उपलब्ध करून देणे, जे शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी अधिक कार्यक्षम आणि दीर्घकालीन उपाय देतात.

कार्यक्रमाला भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणेचे उपसंचालक अक्षय कुटे, मिपा इंडस्ट्रीजचे संचालक प्रकाश रिजाल, प्रदीप वाघ, मॅनेजर आनंद ताटे, आनंद दास, विशाल मुखी, राजकुमार सिंग, राजकुमार पवार, विशाल चव्हाण, तसेच वेल्डी कंपनीचे जिनिश जोसेफ आणि यशोदीप जाधव उपस्थित होते.

बीआयएसचे अक्षय कुटे यांनी शेततळी उत्पादक व वितरकांनी आयएसआय मार्क असलेली उत्पादने पुरवावीत आणि मानकांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. वेल्डीचे जिनिश जोसेफ यांनी राजस्थानही मोठी बाजारपेठ असल्याचे सांगून प्लास्टिक वेल्डिंग तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव नितीन पटवा व खजिनदार करण मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश रिजाल आणि प्रदीप वाघ यांनी आभार मानले.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×