Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शंभर टक्के फी माफीमुळे मुलींच्या तंत्रशिक्षणाला गती

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी तंत्रशिक्षणाची मोठी संधी

marathinews24.com

पुणे – लेक शिकली, प्रगती झाली’ ही केवळ एक म्हण नाही, तर आजच्या बदलत्या समाजाचा मार्गदर्शक विचार बनली आहे. महिलांचे शिक्षण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. शिक्षित महिला म्हणजे सक्षम कुटुंब, जागरूक समाज आणि प्रगत राष्ट्र ही जाणीव लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमामध्ये मुलींसाठी शंभर टक्के शुल्क माफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. हा निर्णय राज्यातील हजारो कुटुंबांसाठी दिलासा देणारा आणि मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरत आहे.

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे – सविस्तर बातमी

तंत्रशिक्षण हे रोजगारक्षम शिक्षण मानले जाते. इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमामुळे मुलींना कमी कालावधीत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करता येतात. प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या (प्रॅक्टिकल) माध्यमातून त्यांना कामाचा अनुभव मिळतो. त्यामुळे त्या केवळ सैद्धांतिक ज्ञानावर अवलंबून राहत नाहीत, तर उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी तयार होतात.

आज उत्पादन उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, ऑटोमोबाईल आणि आता नव्या युगामध्ये संगणक अभियांत्रिकीसोबतच इतर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स आदी अनेक क्षेत्रांमध्ये मुलींसाठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. तंत्रशिक्षणामुळे त्या आत्मनिर्भर बनतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याची क्षमता विकसित करतात. एक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा आधारस्तंभ बनते.

अनेक कुटुंबांमध्ये आजही आर्थिक मर्यादा ही मुलींच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरते. विशेषतः तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक मुली दहावी किंवा बारावीनंतर शिक्षण थांबवतात. अशा परिस्थितीत ही फी माफी योजना मुलींसाठी एक मोठा आधार ठरते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत आहे, अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येते. त्यामुळे आर्थिक अडथळ्यांमुळे शिक्षण थांबण्याची वेळ येत नाही.

ही योजना अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी महाडिबीटी (DBT) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. डिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतो आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण होते. यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होते. विद्यार्थ्यांना कार्यालयीन प्रक्रियेमध्ये अडकून पडावे लागत नाही आणि त्यांना सहजपणे योजनेचा लाभ मिळतो. डिजिटल प्रणालीमुळे शिक्षण क्षेत्र अधिक आधुनिक आणि सोयीस्कर बनले आहे.

या योजनेमुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक आधार सहज उपलब्ध होतो. त्यामुळे केवळ शहरी भागातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलीही तंत्रशिक्षणाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. यामुळे शिक्षणातील असमानता कमी होण्यास मदत होत आहे. प्रत्येक मुलीला तिच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शिक्षण घेण्याची समान संधी मिळत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एखाद्या छोट्या गावातील मुलगी तंत्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहू शकते, हे या योजनेमुळे शक्य होत आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा हा उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि समाजात समान संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षित आणि आत्मनिर्भर महिला समाजाच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलतात. त्यामुळे अशा योजनांचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही.

आजच्या काळात मुली शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि प्रशासन अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशा वेळी आर्थिक अडचणी त्यांच्या प्रगतीत अडथळा ठरू नयेत, यासाठी ही फी माफी योजना अत्यंत महत्त्वाची ठरते. मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी ही योजना राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अधिक माहितीसाठी https://msbte.ac.in तसेच https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकलन- विभागीय माहिती कार्यालय, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×