Breking News
तालुका स्तरावर अन्न व औषध प्रशासनाचे संपर्क कक्ष सुरू करण्याची ओमप्रकाश यांची मागणी..मोशी कचरा डेपो दुर्घटना : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे निर्देशकाळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडंपालखी सोहळ्यात भाविकांकडील दागिने लंपासलोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेमोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकाचा मृत्यूऑपरेशन टायगर हे उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलितवारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “महिला उन्नती वारी २०२६” उपक्रमाचा ऊरळी कांचन येथे शुभारंभश्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी माळेगाव बु. सज्ज

काळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडं

काळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडं

दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात छोटी धरणे बांधण्याची मागणी

marathinews24.com

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मुंबईसह ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सारख्या वाढत्या उपनगरांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरण व शाई धरण यांना शेतकरी व स्थानिक रहिवासी यांचा विरोध असल्याची ठाम भूमिका ” काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था, काळू परिसर यांच्या शिष्टमंडळाने खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन मांडली आहे. सद्या काळू धरणाच्या संभाव्य बाधित क्षेत्रातील सुरू असलेल्या प्रशासकीय हालचाली त्यामुळे निर्माण झालेले शेतकरी प्रश्न या विषयी चर्चा केली.

खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल – सविस्तर बातमी 

स्थानिकांमध्ये धरण विरोधी असलेल्या असंतोषाची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी केली. सरकारच्या या अन्यायकारक काळू व शाई या मोठ्या प्रकल्पांऐवजी दोन्ही नद्यांच्या परिसरातील खोऱ्यात छोटी छोटी धरणे बांधल्यास शहराच्या पाण्याची तहान भागवून स्थानिकांना सिंचन आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध करता येईल. त्याकरिता काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांनी सुचवलेल्या १६ संभाव्य ठिकाणचे सर्व्हेक्षण करून तसा अहवाल बनविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी धरण क्षेत्रातील जनसामान्यांच्या भावना शिष्टमंडळ यांच्याकडून जाणून घेतल्या व योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ज्येष्ठ शेतकरी नेते हरिभाऊ राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विलासकाका देशमुख, माहिती अधिकार महासंघ ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष राऊत, शेतकरी प्रतिनिधि प्रविण देशमुख, संभाजी गोडांबे, रघुनाथ देशमुख व खुटल बा ग्रामपंचायतचे उपसरपंच भावेश पठारे यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश देशमुख, चिटणीस विलास पठारे, कोषध्यक्ष शाम देशमुख, सह-सचिव कैलास निमसे, सह-कोषअध्यक्ष रोशन चौधरी पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×