Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ताज्या घडामोडी

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू
ताज्या घडामोडी

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

पाषाणमधील सूस रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता, तसेच येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरात अपघाताच्या घडल्या घटना marathinews24.com पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा […]

ताज्या घडामोडी

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एआयआधारित अर्लट यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक marathinews24.com मुंबई – मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक

ताज्या घडामोडी

एकदिवसीय रमाई साहित्य संमेलनाचे ३० मे रोजी आयोजन

संमेलनाच्या अध्यक्षपदी रमणी सोनवणे यांची निवड marathinews24.com पुणे – महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने महामाता  रमाई भीमराव आंबेडकर

काळू धरणाचा संघर्ष पेटण्याची शक्यता
ताज्या घडामोडी

काळू धरणाचा संघर्ष पेटण्याची शक्यता

शेतकरी नेते राजू शेट्टी यांची आंदोलनाची हाक marathinews24.com ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यासह मुंबई, ठाणे, कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि

ताज्या घडामोडी

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव marathinews24.com पुणे – संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी

ताज्या घडामोडी

वाघ-मानव संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्या- शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

चंद्रपुरातील वाघ हल्लाप्रकरणाची डॉ. गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल marathinews24.com मुंबई – सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद
ताज्या घडामोडी

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद

सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त marathinews24.com पुणे – शहरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, गुन्हे शाखेच्या पथकाने शंकरशेठ

पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर
ताज्या घडामोडी

पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

चारित्र्याचा संशयावरुन खून केल्याचे उघड marathinews24.com पुणे – चारित्र्याच्या संशयावरुन महिलेच्या डोक्यात रिकामा सिलिंडर घालून खून करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना ११ हजार कोटींचे १५ दिवसांत वितरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ताज्या घडामोडी

प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस marathinews24.com मुंबई – महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर

दि.१५ एप्रिल २०२६ *नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी उद्यापासून संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधेयकाचे जोरदार स्वागत; “३० वर्षांची प्रतीक्षा संपली, महिलांना समान संधी मिळणार”* मुंबई.दि.१५: नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३ (महिला आरक्षण विधेयक) च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर संसदेत उद्यापासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या संदर्भात आज विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘नारी शक्ति वंदन अधिनियम २०२३’ या विषयावर मुंबई येथील पुरंदर निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९९८ मध्ये पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक रद्द झाले होते. त्यानंतर २००८ आणि २०१० मध्ये राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यावेळी लोकसभेत विरोधक कागद फाडून टाकत असल्याने ऑनलाइन बिल सादर करण्यात आले. २०१४ मध्ये १५ व्या लोकसभेचा कालावधी संपल्याने ते विधेयक व्यपगत झाले मात्र नवीन लोकसभेत २०२३ मध्ये त्याला पुनर्जीवन मिळाले आणि ते मंजूर झाले.” *जनगणना आणि पुनर्रचनेची सांगड* डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “सध्याच्या विधेयकात जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेची तरतूद होती. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात ही अट वगळण्यात येणार आहे. ही १३१ वी घटनादुरुस्ती असेल. लोकसभेत ३५ टक्के आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे महिलांना किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल, याबाबत स्पष्ट मांडणी केली जाईल.” *स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशस्वी अनुभव* स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. १९९४ पासून अनेक निवडणुका झाल्या. “माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार, प्रत्येक निवडणुकीत अधिक शिक्षित, सक्षम आणि जागरूक लोकप्रतिनिधी निवडून येतात. महाराष्ट्रात ओबीसी, एससी आरक्षणामुळे सर्व घटकांतील महिलांना चांगली संधी मिळाली आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी ‘पतीराज’ या आक्षेपावर स्पष्टीकरण देताना सांगितले, “कुटुंबातील व्यक्ती संवाद साधत असेल किंवा पक्षीय भूमिका घेत असेल, तरी अनेक महिला महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेविका स्वतंत्रपणे काम करतात. त्यांची स्वतःची वोट बँक तयार झाली आहे. ठाणे, कल्याणसारख्या ठिकाणी आरक्षण नसतानाही महिलांना सर्वसाधारण जागांवर संधी देण्यात आली आहे.” *आरक्षणाचे महत्त्व आणि विरोधकांना उत्तर* डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “पूर्वी आरक्षणाला ‘पांगळेपणाची खूण’ म्हणून पाहिले जायचे, पण आता ते समान संधीसाठी विशेष संधी म्हणून स्वीकारले जाते. सोशल मीडियामुळे चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, बदनामी यांची भीती महिलांना राजकारणापासून दूर ठेवते. आरक्षणामुळे राखीव संधी मिळाल्याने ‘महिला रेल्वेच्या राखीव डब्याला जसा अग्रक्रम देतात’ त्या प्रमाणे त्यांना आरक्षणामुळे सुरक्षित वाटेल.” महिला सुरक्षितता, शिक्षण, रोजगार, बचत गटांसोबत पीडित महिलांना भेटणे, कायद्याची अंमलबजावणी, पाणी-विकास-रस्ते-आरोग्य अशा मुद्द्यांवर महिलांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. “जेव्हा स्त्रियांची संख्या वाढते, तेव्हा भाषा बदलते आणि सार्वजनिक वाहतूक, मतदारसंघातील दळणवळण सुरक्षित होण्याकडे लक्ष दिले जाते,” असे त्यांनी नमूद केले. *मतदानात महिलांची वाढती भागीदारी* “महिलांची मतदानाची टक्केवारी तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांत वाढली आहे. त्यांच्यात जागृती वाढत आहे. हे विधेयक राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे,” असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी महायुती सरकारचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एनडीएचे पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांना योग्य सूचना दिल्याचेही त्यांनी नमूद केले. *पंतप्रधान मोदींच्या इच्छाशक्तीचे कौतुक* “१९९६ पासून ३० वर्षे हे बिल अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती दाखवली. २०३० पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनुसार ५०-५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व हवे. हे प्रागतिक विधेयक आहे. संपूर्ण भारतातील प्रत्येक घरातील स्त्रीचे लक्ष याकडे आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. असंघटित क्षेत्रातील महिलांच्या जीवनातही बदल घडवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. गोऱ्हे यांनी या विधेयकाचे मनापासून स्वागत केले आणि महाराष्ट्रातील महिला कार्यकर्त्यांसह सर्व महिलांना या संधीचा उपयोग करून सुप्रशासन आणि सुरक्षित समाज घडवण्याचे आवाहन केले. ------
ताज्या घडामोडी

‘पत्नी मोलकरीण नाही’ या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

महिलांच्या सन्मान, समानता आणि स्वातंत्र्याला न्याय देणारा निर्णय-डॉ. नीलम गोऱ्हे marathinews24.com पुणे – पत्नीने स्वयंपाक, साफसफाई किंवा घरातील इतर कामे

error: Content is protected !!
Scroll to Top
×