Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महाराष्ट्राला बेकायदेशीर स्थलांतरित विरोधात विशेष अधिकार व विशेष कायदा करण्याची मागणी

नागरिक सोशल फाउंडेशन ची मागणी

marathinews24.com

पुणे – राज्यात वाढत्या बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या बघता केंद्र सरकारने सरकारने तात्काळ बेकायदेशीर स्थलांतरितांची हकालपट्टी करण्याकरता एक विशेष कायदा बनवावा. तसेच अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये देखील महाराष्ट्र शासनाला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान करावेत अशी मागणी संस्थेने केलेली आहे. याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी पत्र पाठवले आहेत अशी माहिती ॲड मंजिरी जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

25 लाख अनुयांच्या उपस्थितीत शौर्य दिन अभिवादन सोहळा संपन्न – सविस्तर बातमी

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होतया. यावेळी अमेय सप्रे, ॲड. सर्वेश मेहेंदळे उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड मंजिरी जोशी म्हणाल्या, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील विविध राज्यांमध्ये शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या संबंधित देशांमध्ये परत पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राज्य व केंद्र सरकारांनी संयुक्तपणे बेकायदेशीर स्थलांतराविरोधात व्यापक मोहिमा राबवल्या. या कारवायांदरम्यान आढळून आलेल्या कागदपत्रविहीन व्यक्तींची संख्या अत्यंत धक्कादायक होती व या समस्येची गंभीरता आणि तातडी स्पष्टपणे अधोरेखित झाली.

स्थलांतर व परकीय नागरिक कायदा, 2025 [Immigration And Foreigners Act 2025] हा सीमापार हालचाली नियंत्रित करणे व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबी हाताळण्यासाठी तयार करण्यात आला असला, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे हे त्यातील गुंतागुंतीच्या वेळखाऊ कायदेशीर प्रक्रियेमुळे शक्य नाही. परिणामी राष्ट्रीय पातळीवर या कायद्याची कठोर व प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण बनते.

या पार्श्वभूमीवर, बेकायदेशीर स्थलांतरावरील अंमलबजावणी अधिकार वैयक्तिक राज्यांना देणे अत्यावश्यक आहे. आसाम स्थलांतरित (हकालपट्टी) अधिनियम, 1950 यांच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली यंत्रणा राज्य सरकारांना त्यांच्या प्रादेशिक परिस्थितीनुसार त्वरित व परिणामकारक कारवाई करण्यास सक्षम ठरू शकते. अशा विकेंद्रित अधिकाररचनेमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल, अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि प्रामाणिक भारतीय नागरिकांचे हक्क व हितसंबंध प्रभावीपणे संरक्षित राहतील.

NSF ने सुचविलेल्या कायदेशीर तरतुदी पुढीलप्रमाणे असाव्यात

1] तातडीच्या आणि अपवादात्मक परिस्थितीत प्रभावी ठरणाऱ्या इमिग्रंट्स (एक्सपल्शन फ्रॉम आसाम) ॲक्ट, 1950 सारख्या विशेष प्रतिबंधात्मक स्वरूपाचा कायदा महाराष्ट्र सरकारला प्रदान करावा
2] स्थलांतर व परकीय नागरिक कायदा, 2025 [Immigration And Foreigners Act 2025 ] या कायद्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र सरकारला या कायद्याअंतर्गत विशेष अधिकार द्यावेत,
3] महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला आंतरराष्ट्रीय बॉर्डर प्रमाणे कोस्टल पेट्रोलिंग गार्डना तात्काळ हकालपट्टीचे आदेश देण्याचे महाराष्ट्र सरकारला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अधिकार द्यावेत,
4] महाराष्ट्रामध्ये डिटेन्शन सेंटर व फॉरेन ट्रिब्युनल असावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×