Breking News
पुण्यातील पोलिस हवालदार गणेश जगतापला आंध्रप्रदेशातून अटकबाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्नपुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतूनच आज ‘लाडक्या बहिणी’ सक्षम – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेले कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करता येत आहे. सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना, संधी आणि ‘लाडक्या बहिणी’सारखे उपक्रम उभे राहिले आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सामान्य महिलांना दिलासा मिळेल अशा योजना प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, यामुळेच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

आजही समाजात मुलींवरील अत्याचार, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचित राहण्यासारख्या समस्या अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘सेफ कॅम्पस’ संकल्पनेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, पुणे माळी महासंघाच्या हेमाताई लडकत, बाळासाहेब लडकत, प्रज्वल बनकर, यशोधन आखाडे, महात्मा फुले मंडळाचे विश्वस्त योगेश वाघोले, पर्वती प्रभागातील शिवसेना उमेदवार महेंद्र जोशी, तुषार भामरे, भारती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×