Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतूनच आज ‘लाडक्या बहिणी’ सक्षम – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेले कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करता येत आहे. सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना, संधी आणि ‘लाडक्या बहिणी’सारखे उपक्रम उभे राहिले आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सामान्य महिलांना दिलासा मिळेल अशा योजना प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, यामुळेच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

आजही समाजात मुलींवरील अत्याचार, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचित राहण्यासारख्या समस्या अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘सेफ कॅम्पस’ संकल्पनेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, पुणे माळी महासंघाच्या हेमाताई लडकत, बाळासाहेब लडकत, प्रज्वल बनकर, यशोधन आखाडे, महात्मा फुले मंडळाचे विश्वस्त योगेश वाघोले, पर्वती प्रभागातील शिवसेना उमेदवार महेंद्र जोशी, तुषार भामरे, भारती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×