Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिम्बॉयसिस शाळेत मतदानाचा हक्क बजावला

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिम्बॉयसिस शाळेत मतदानाचा हक्क बजावला

मतदानाचा हक्क बजावणे हे लोकशाहीचे मूलभूत कर्तव्य, सर्वांनी मतदान जरूर करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

marathines24.com

पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी सिम्बॉयसिस शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी साडेदहाच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही – सविस्तर बातमी 

यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे हे लोकशाहीचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यानुसार सर्वांनी मतदान जरूर करावे. पुणे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, प्रशासनाने एकूण व्यवस्था चांगली केली असली तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी पायऱ्यांवरून जाण्याची योग्य सोय दिसत नाही. या मतदान केंद्रावर मतदार यादीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला आहे, तर इतर मतदारांचे केंद्र विद्याभवन शाळेतच ठेवण्यात आले आहे. तरीही मतदानाचा हक्क बजावणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

कालपर्यंत राज्यात निवडणुकीचे वातावरण अशांत होते, पण आता लोकांमध्ये मतदानाची जाणीव निर्माण झाली आहे. मतदार कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे मतदान करतील, याची खात्री आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, बहुतांश ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसले. मात्र, काही केंद्रांवर मोबाईल आत नेण्याबाबत कडक नियम लावले जात असल्याने मतदारांना त्रास होत आहे. मोबाईल ठेवण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे, कारण मतदार मोबाईल कुठे ठेवायचा म्हणून मतदान करत नाहीत आणि काहीजण केंद्र सोडून परत जात आहेत, असं त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×