कठोर परिश्रमातून मिळवली वकिली पदवी
marathinews24.com
सातारा – खंडाळा तालुक्यातील नायगाव (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव) या छोट्याशा गावातील ऋषिकेश सिंधू दीपक नेवसे यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातून वकिलीची पदवी प्राप्त केली आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या ऋषिकेश यांचे संगोपन आईने प्रचंड कष्ट व मेहनत करून केले. शिक्षणाची गंगा लाभलेल्या या गावात ऋषिकेश यांनी शिक्षणाचा वारसा पुढे नेला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला – सविस्तर बातमी
कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेत ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढे मुंबई विद्यापीठात वकिली शिक्षण घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अभ्यासात हुशार आणि मेहनती असल्यामुळे त्यांनी हे यश मिळवले.
त्यांच्या यशामध्ये कुटुंबाचा तसेच नायगाव गावातील समाजाचा मोठा वाटा असलेला दिसून येतो आई, आजी, चुलते, काकी, चुलत भाऊ-बहिणी यांच्या पाठिंब्यामुळेच शिक्षणाची वाट अधिक ऋषिकेश ला सोपी झाली. १८ वर्षांचा असतानाच घराबाहेर पडून आयुष्याचा संघर्ष सुरू केलेल्या ऋषिकेश यांनी आज परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यभूमी असलेल्या नायगाव गावातील या नव्या पिढीच्या ऋषिकेशच्या यशामुळे गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. गावातून शिक्षणाचा वारसा पुढे नेणारे ऋषिकेश नेवसे हे तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.






















