१,८५८ कोटींच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा – शासनाच्या निर्णयाचे उपसभापतींनी केले कौतुक
marathinews24.com
मुंबई – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी वितरित केलेल्या १ हजार ८५८ कोटी ६७ लाखांच्या आर्थिक मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. ही मदत म्हणजे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे, तर शासनाने शेतकऱ्यांप्रती दाखवलेली संवेदनशीलता आणि बांधिलकीचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना सांगीतिक अभिवादन – सविस्तर बातमी
शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीमुळे पीकहानी, दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऐन दिवाळीपूर्वी दिलेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. डॉ. गोऱ्हे यांनी कृषी विभाग, वित्त विभाग आणि संबंधित सर्व अधिकार्यांचेही आभार मानले. त्या म्हणाल्या, “शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने शासनाची अशीच सहृदय आणि सर्वसमावेशक भूमिका पुढेही कायम राहील, अशी अपेक्षा आहे.”






















