Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

दिवंगत देशमुखांच्या स्मृतिप्रीत्यर्थास १०४ जणांनी केले रक्तदान

दिवंगत देशमुखांच्या स्मृतिप्रीत्यर्थास १०४ जणांनी केले रक्तदान

गावांमध्ये उपक्रम राबवून केला संकल्प दिवस साजरा

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या द्वितीय स्मृतिप्रीत्यर्था दिनी रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन गुरुवारी ( दि.११) केले होते. जनसंतोष फाउडेंशनच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी दिवंगत संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून मित्र परिवाराकडून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. रक्तदान शिबीराला सुरुवात करण्यात आली.

रक्तदान शिबिरात दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, धनंजय देशमुख , पंचायत समिती सदस्य सहदेव घाटूळ, संदीप देशमुख, पंजाबराजे देशमुख यांच्यासह गावातील १०४ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. ज्या नागरिकांनी रक्तदान केले, त्यांना जनसंतोष फाउडेंशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमा देऊन गौरव केला. तसेच दर्गा व कब्रस्तानाचे सुशोभीकरण करण्यात आले. गावातील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये १० फुटाची विविध प्रकारचे ५० झाडे लावण्यात आली. त्यात ताम्हण, कदंब, कांचन, अमलतास, बुच, चाफा यांचा समावेश आहे. वृक्षरोपन करताना श्रीकांत सोनवणे, आनंद सोनवणे, अनिल शिंदे, धनंजय देशमुख, दिपक सोनवणे, जनक देशमुख , महावीर सोनवणे यांनी पर्यावरणाचा संदेश दिला.

झाडे लावा, झाडे जगवा’ हा केवळ एक नारा नसून, भावी पिढीच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काळाची गरज आहे.झाडे आपल्याला प्राणवायू (ऑक्सिजन), फळे, औषधे आणि निवारा देतात म्हणून, केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नाही, तर लावलेली झाडे पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांची काळजी घेणेही आपले आद्य कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.या संकल्प दिनासाठी गावतील तरूण, नागरीक आणि पंचक्रोशीतील दिवंगत संतोष देशमुख यांच्यावर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×