आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज, चिमुरड्यांनी पूरग्रस्तांना दिले खाऊचे पैसे

विविध क्षेत्रातून पूरग्रस्तांना मिळत आहे मदत

marathinews24.com

पुणे – आम्हाला नाही तर आमच्या शेतकरी बांधवांना खाऊची गरज असल्याची भावना करंजेपुलमधील राजनंदिनी आणि राजवीर मालेगावकर यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या खाऊचे जमा केलेले २ हजार ३०० रुपये रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून दिली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन कौतुक केले.

‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद्घाटन – सविस्तर बातमी

राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या संकटकाळात राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना धीर देत त्यांचे जीवनमान पूर्वपदावर आण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे, संकटाच्याकाळात एकमेकांना मदत करणे ही आपल्या राज्याची परंपरा व संस्कृती आहे. आगामी काळातही पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन पवार यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×