Breking News
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरे

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतूनच आज ‘लाडक्या बहिणी’ सक्षम – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेले कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण, सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करता येत आहे. सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना, संधी आणि ‘लाडक्या बहिणी’सारखे उपक्रम उभे राहिले आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम – सविस्तर बातमी 

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सामान्य महिलांना दिलासा मिळेल अशा योजना प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच शाळाबाह्य मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडली, यामुळेच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले.

आजही समाजात मुलींवरील अत्याचार, बालविवाह आणि शिक्षणापासून वंचित राहण्यासारख्या समस्या अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘सेफ कॅम्पस’ संकल्पनेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, पुणे माळी महासंघाच्या हेमाताई लडकत, बाळासाहेब लडकत, प्रज्वल बनकर, यशोधन आखाडे, महात्मा फुले मंडळाचे विश्वस्त योगेश वाघोले, पर्वती प्रभागातील शिवसेना उमेदवार महेंद्र जोशी, तुषार भामरे, भारती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×