जनजीवन विस्कळीत
marathinews24.com
पुणे – मांजरी बुद्रुक परिसरात मुंढवा जॅकवेलमधून येणाऱ्या कालव्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने घुले वस्ती, ढेरे बंगला आणि गोपाळ पट्टी भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कालवालगतच्या अंदाजे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
खडकीत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्वच्छतागृहाचे उद्घाटन – सविस्तर बातमी
पाणी साचल्याने गोपाळ पट्टी रोडसह अनेक रस्ते जलमय झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची पाण्यातून मार्ग काढताना प्रचंड कसरत होत आहे.
प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मुंढवा जॅकवेल बंद करण्यात आले आहे, प्रशासनाच्या व नागरिकांच्या सहकार्याने पाणी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहेत त्यांची सोय प्रशासनाने गोपाळपट्टी मनपा शाळेत करण्यात आली आहे.























