श्रेयाच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने मोर्चा
marathinews24.com
पुणे – चिखलवाडीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये ३ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गदारोळाचे कारण ठरत आहे. ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली चार महिने तहानले होते, त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता श्रेय घेण्याची चढाओढ सुरु आहे. श्रेयाच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरचिटणीस शरद रणपिसे, राजेंद्र भुतडा, रमेश पवळे, सेल्वराज अँथोनी, नंदलाल धिवार, ज्योती परदेशी सह 100 ते 150 महिला सहभागी झाले होते. औंध रोड डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चिखलवाडी टाकी पर्यंत कॉग्रेसचवतीने मोर्चाकाडून घोषणाबाजी करित जल जन आंदोलन करून नारिकांसाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
पुण्यातील टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय – सविस्तर बातमी
पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनासाठी महानगरपालिकाकडून कोणताही प्रस्ताव नाही. तर प्रशासनाकडून सांगण्यात येते की माजी सदस्यांनी घेतलेला हा अशासकीय आहे. मग मनपाच्या जागेत अनाधिकृत मंडप बांधून कार्यक्रम केला जात आहे. आयुक्त अशा अनाधिकृत मंडप बांधून अशासकीय कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल अरविंद शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना विचारला आहे.
टाकीचे काम पूर्णच झालेले नाही, तेव्हा उद्घाटन कोणत्या आधारावर? अनधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का?अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार? असा आरोप ही विनोद रणपिसे यांनी केला आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्टपाण्याच्या टाकीचा लाभ जनतेला मिळावा म्हणून काँग्रेसने वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन केले. तहन, राजकीय मार्केटिग पाण्याचा प्रश्न जिथे लोकांच्या जगण्याशी निगडीत आहे, तिथे काही माजी नगरसेवक हे केवळ स्वतःचे राजकीय मार्केटिंग आणि श्रेय घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्घाटनाचा घाट घालत आहेत. नगरसेवक नाहीत, तरीही उद्घाटनात झेंडे आणि चेहरे!प्रशासन म्हणते टाकी अपूर्ण, पण काहीजण म्हणतात उद्घाटन करायचं!हे माजी नगरसेवक आज नगरसेवक नाहीत, पण मालक असल्यासारखे वागत आहे, असा आरोप केला.























