Breking News
मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडेसमाज कल्याण कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार‘बारामती’मध्ये सुनेत्रा अजित पवार यांना शिवसंग्रामचा पाठिंबा : डॉ. ज्योती मेटेकोथरूडमध्ये महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीचा उत्साहअनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेपुणे फोटोग्राफर्स असोसिएशनचा ‘फोटो फेअर’ उत्साहात संपन्नवडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट त्वरीत हलवावेत – खासदार मेधा कुलकर्णीवाढदिवशी फुलं नको, ई-कचरा द्या- आमदार हेमंत रासनेमहात्मा फुले यांना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी विशेष आग्रह धरणार

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २९ मार्चला मूल्यमापन चाचणी

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २९ मार्चला मूल्यमापन चाचणी

वाचन, लेखन आणि संख्याज्ञानावर आधारित १५० गुणांची परीक्षा

marathinews24.com

पुणे – केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित राहू न शकलेल्या व कामगिरीत सुधारणा आवश्यक शेरा प्राप्त असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

आंबेडकर जयंतीदरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी – सविस्तर बातमी 

राज्यात अंदाजे ३ लाख असाक्षरांची चाचणी घेण्याबाबत जिल्ह्यांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार आहे. यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१६.५ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (४९.५ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत.

परीक्षेस जाताना एक आयकार्ड आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदींपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असेल. दिव्यांगांसाठी ६० मिनीटांची अधिकची वेळ असेल.

ही चाचणी परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली इत्यादी माध्यमातून होणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी फक्त काळ्या अथवा निळ्या शाईचा बॉलपेन वापरावा. उल्लास ॲपवर नोंदणीकृत असाक्षर व्यक्ती परीक्षेसाठी पात्र असेल. नोंदणी न केलेल्या असाक्षरांसाठी परीक्षा केंद्रावर नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर २९ मार्च रोजी ओळखपत्रासह उपस्थित रहावे. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×