विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत ओबीसी (इतर मागासवर्गीय), ईबीसी (आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय) व डीएनटी (भटक्या व विमुक्त जमाती) विद्यार्थ्यांसाठी “टॉप क्लास शिक्षण” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीच्या महाराष्ट्रातील नामांकित शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
सागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा – सविस्तर बातमी
शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळ https://scholarships.gov.in वर नोंदणी करून अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, पुणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदीप संकपाळ, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे यांनी केले आहे.




















