शनिवार वाड्याजवळ दहीहंडीच्या गर्दीत घडली घटना
marathinews24.com
पुणे – दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मध्यवर्ती शनिवार वाड्याजवळ आलेल्या दोघा तरुणांना महागात पडले आहे. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरुन नेल्या आहेत. ही घटना ५ सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास शनिवार वाड्याजवळ घडली आहे. याप्रकरणी धानोरीत राहणार्या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि साक्षीदार हे ५ सप्टेंबरला दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात आले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी तक्रारदाराच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन चोरुन नेली. त्यानंतर चोरट्यांनी दुसर्या तरुणाच्या गळ्यातील ६० हजारांची चैन हिसकावून नेली. काही वेळानंतर दोघांनाही गळ्यात सोन्याची चैन दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार निकम तपास करीत आहेत.





















