Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

समाजात निकोप लैंगिकता शिक्षणाची गरज; अन्नपूर्णा परिवाराच्या डॉ. मेधा सामंत – पुरव यांचे विचार.

“बलात्कार एक अटळ वास्तव? पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

marathinews24.com

पुणे – “बलात्कार आणि स्त्रीदास्यांचे मूळ ही असमानता आहे. विज्ञानवादी आणि समतावादी समाज घडवण्याची आवश्यकता असून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पुरुषांशी संवाद साधायला हवा. समाजात आज स्पष्ट आणि निकोप लैंगिकता शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.” असे विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख डॉ. मेधा सामंत – पुरव यांनी व्यक्त केले. लेखक विवेक काशीकर लिखित आणि साहित्यविश्व प्रकाशन प्रकाशित “बलात्कार एक अटळ वास्तव?” या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून यावेळी एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे येथे त्या बोलत होत्या.

बिबट्यांचे वाढते हल्ले आणि समस्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तत्पर भूमिका – सविस्तर बातमी

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिजीत वैद्य, कॉ. मुक्ता मनोहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विवेक काशीकर, प्रकाशक विक्रम मालन आप्पासो शिंदे, संविधान प्रचारक संदीप बर्वे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले,”बलात्कार ही अनैतिकतेची परिसीमा आहे. सत्ता आणि धाक निर्माण करण्यासाठी स्त्रियांवर बलात्कार केला जातो. स्त्रीचं वस्तुकरण हे बलात्कारच एक महत्वाचं कारण आहे. जेव्हा भांडवलशाही स्त्रीला पुढे घेऊन जायला लागते तेव्हा बलात्कार हे अटळ बनायला सुरुवात होते. बलात्कार एक अटळ वास्तव या पुस्तकात लेखकाने बलात्कार या विकृतीला विविध सामाजिक अंगांनी मांडणी केली आहे.

कॉ. मुक्ता मनोहर म्हणाल्या,” देशात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. चंगळवादी संस्कृतीने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उपभोगाची वस्तू असा केला आहे. पुरुषत्व गाजवण्याचा बलात्कार हा प्रकार असून ते शस्त्र म्हणून वापरले जाते. हे सर्व बदलण्याची आज वेळ आली आहे.

विवेक काशीकर म्हणाले,” सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्यामागील मूळ कारणे शोधावे लागतात. बलात्कारासारख्या घृणास्पद घटनेची चिकित्सा करून योग्य व व्यवहार्य उपाय सुचविण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात श्रुती शालिनी यांच्या संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने झाली. डिझायनर नंदू लोखंडे, चित्रकार मिलिंद जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी पुस्तक प्रकाशनामागची भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संविधान प्रचारक नीलम पंडित यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×