गणेश पेठेतील घटना
marathinews24.com
पुणे – क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने दहशत माजवून दोघांना मारहाण केल्याची घटना गणेश पेठ परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अनिल मोतीलाल कल्याणकर (वय ४८, रा. श्री स्वामी समर्थ काॅम्प्लेक्स, दूधभट्टीसमोर, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरुडमध्ये वादातून युवकाला मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणकर यांचा मुलगा आणि चुलत नातू हे रविवारी (३० नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास क्रिकेट खेळून घराजवळ थांबले होते. क्रिकेट खेळताना त्यांचा काहीजणांशी वाद झाला होता. या घटनेनंतर आठ ते दहा जण तेथे आले. त्यांनी कल्याणकर यांचा मुलगा आणि नातवाला शिवीगाळ करुन मारहाण केली. या घटनेत दोघे जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक जहाळे तपास करत आहेत.






















