१ हजार लिटर क्षमतेचा थंड पाण्याचा प्रकल्प सुरू
marathinews24.com
पुणे – शहरातील शिवाजीनगर बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी शुद्ध व थंड पाण्याचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. उन्हाळ्याचा तडाख आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन, ‘इजाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बस स्थानकावर दोन अत्याधुनिक फिल्ट आणि थंड पाण्याचे पंप बसवण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन एस. टी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक (नियंत्रण) अमृता ताम्हणकर यांच्या हस्ते पार पडले.
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी
शिवाजीनगर बस स्थानक हे शहराचे मुख्य वाहतूक केंद्र असून कानाकोपऱ्यात हजारो नागरिक प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या पाहत असून येथून राज्याच्य पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेकदा निर्माण होत असे. ही बाब लक्षात घेऊन आगाच प्रशासनाने पुढाकार घेतला आणि ‘इजाकी इंडिया’च्या सहकार्याने प्रत्येकी ५०० लिटर असे एकूण १ हजार लिटर क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण व शीतकरण यंत्र बसवले आहेत. यामुळे आता प्रवाशांना दिवसभर शुद्ध आणि गारेगार पाणी मोफत उपलब्ध होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ आगार व्यवस्थापक संजय वाळवे, कनिष्ठ आगाज व्यवस्थापक अभिजीत थोरात, इजाकी इंडिया कंपनीचे प्रतिनिधी, आगाराचे कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
























