Breking News
बेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटकक्रेन ऑपरेटरवर हल्ला; फायनान्स रिकव्हरी एजंटसह तिघांविरुद्ध गुन्हापुण्यात सहायक फौजदारासह हवालदार निलंबितवानवडी पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांना दणका

सुर-संगीताने रंगले पं.  जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे चौथे सत्र

सुर-संगीताने रंगले पं.  जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे चौथे सत्र

निषाद व्यास, अनुपम जोशी आणि जयंत केजकर यांच्या सुरेल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध; अभिजात संगीताची अविस्मरणीय मेजवानी

marathinews24.com

पुणे – अवीट गोडीच्या चालींनी सजलेल्या बंदिशी, गायकांचे अप्रतिम सादरीकरण, सरोदच्या तारांवर उमटणारे मधुर सूर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा सुरेल संगमाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव रंगून गेला.

एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले – सविस्तर बातमी 

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निषाद व्यास (गायन), अनुपम जोशी (सरोद) आणि जयंत केजकर (गायन) यांनी आपल्या कलेचा अप्रतिम आविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सकाळच्या सत्राची सुरुवात निषाद व्यास यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये सादर केलेल्या ‘सरस्वती चे मागत हो’ या बंदिशीने रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती दिली. त्यानंतर ‘साधू रचना राम बनाई रे’ या सादरीकरणातून त्यांनी बनारस घराण्याच्या गायकीचा ठसा उमटवला. त्यांच्या सादरीकरणाला कौशिक केळकर (तबला) आणि माधव लिमये (संवादिनी) यांची समर्थ साथ लाभली.

यावेळी बोलताना निषाद व्यास यांनी, “जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. येथे गायन करणे म्हणजे पंडित अभिषेकी यांच्या चरणी संगीत सेवा अर्पण करण्यासारखे आहे,” असे सांगितले.

यानंतर अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने मैफिलीत वेगळाच रंग भरला. त्यांनी राग बसंतने वादनाची सुरुवात केली. सरोद हे वाद्य मुख्यतः राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचलित असले तरी मराठी संगीत परंपरेशी त्याचा संगम घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘खेळ मांडीयेला वाळवंटी दारी, नाचती वैष्णव ठायी रे’ हा अभंग सरोदवर सादर करत त्यांनी वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला महेशराज साळुंखे आणि संजय प्रधान (तबला) यांची साथ लाभली. यावेळी आयोजक उज्वल केसकर यांनी कलाकारांचा सत्कार केला.

महोत्सवातील ‘पंडित जितेंद्र अभिषेकी प्रथितयश कलाकार’ पुरस्कार प्राप्त जयंत केजकर यांनीही आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी राग जौनपुरीने मैफिलीची सुरुवात करत विविध रागांच्या सादरीकरणातून अभिजात संगीताची मेजवानी दिली. त्यांच्या सादरीकरणाला अभिजीत जायदे (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

संपूर्ण सत्रभर रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद देत महोत्सवाची रंगत अधिक खुलवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×