Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

किरकोळ वादातून मित्रावरच केला प्राणघातक हल्ला

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रशिक शिंनगारेवर सपासप वार;आरोपी अद्याप मोकाट

marathinews24.com

बीड – किरकोळ वादाचा राग मनात धरून मित्रानेच मित्रावर प्राणघातक चाकूने हल्ला केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील एकदरा येथे काही दिवसांपूर्वी घडली आहे . या घटनेत प्रशिक भाऊसाहेब शिनगारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप ही मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाला आहे.

पैशांच्या वादातून पोटात खुपसला चाकू – सविस्तर बातमी

प्रशिक शिनगारे आणि आरोपी सोहेल बाबू पठाण हे एकाच गावातील रहिवासी असून पूर्वी दोघांमध्ये मैत्री होती. ते दोघेही एका पेट्रोल पंपावर एकत्र काम करत होते. वर्षभरापूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने प्रशिकविरोधात खुन्नस काढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या दिवशी आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत धारदार शस्त्र काढून प्रशिक शिनगारे यांच्या पाठीवर, छातीवर,पोटावर वार केले आहेत.

हल्ल्यात प्रशिक गंभीर जखमी झाल्याने. त्याला तातडीने उपचारांसाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल
करण्यात आले होते. उपचारानंतर दि. ३१ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यानंतर प्रशिक शिनगारे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी सोहेल बाबू पठाण, बाबू हुसेन पठाण आणि निवृत्ती रामकिसन कळसे (सर्व रा. एकदरा) यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच सुधारित बी.एन.एस. कायदा २०२३ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, माजलगाव तालुक्यात अलीकडील काळात वाढत असलेल्या मारहाण, हल्ले व जातीय तणावाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकरणांत कारवाई न झाल्यास समाजात चुकीचा संदेश जातो. त्यामुळे कोणताही दबाव न घेता आरोपींना तात्काळ अटक करून कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×