Breking News
विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडेपुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जीअपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधारअल्पवयीन पीडित मुलीला उपचारासाठी ८ तास ताटकळत ठेवणे डॉक्टरांना भोवले“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे – शेत रस्ते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये समावेश करण्यात यावा, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. जिल्ह्यात अधिकाधिक रस्ते निर्माण करण्यात यावेत, याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दिवंगत देशमुखांच्या स्मृतिप्रीत्यर्थास १०४ जणांनी केले रक्तदान – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यावेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार म्हणाल्या, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते मिळणार आहेत. रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासह त्यांच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ते निर्माण करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन पवार यांनी केले.

योजनेच्या प्रगतीचा आढावा दरमहा बैठक आयोजित घेण्यात येईल, जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पुढील बैठकीस जिल्ह्यातील आमदारांना निमंत्रित करावे, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

यावेळी जगदाळे यांनी या योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचा समावेश करण्याबाबत सूचना केली. जिल्ह्यात रस्ते निर्मितीच्या कार्यात सहकार्य करण्यात येईल, असेही   जगदाळे म्हणाले.

जिल्हाधिकारी डुडी यांनी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने निश्चित केलेले कंत्राटदारांची सूची (पॅनल), कमी दराची निविदा (एल १) दर, मोजणी करुन निश्चित केलेले ५०५ रस्ते आदीबाबत माहिती दिली तसेच मोजणी झालेल्या रस्त्यांचे आठवड्याभरात काम सुरु करणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×