Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मागेल त्याला सौर कृषीपंप’, पुणे जिल्ह्यात ५ हजार ६५४ शेतकऱ्यांना लाभ

मागेल त्याला सौर कृषीपंप’, पुणे जिल्ह्यात ५ हजार ६५४ शेतकऱ्यांना लाभ

कर्जमुक्तीच्या घोषणेसह शेतकऱ्यांसाठी दिलासा

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा करत दिलासा दिला असून, त्याचबरोबर शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीही सुरू ठेवली आहे. त्यापैकी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ ही योजना पुणे जिल्ह्यात यशस्वी ठरत असून, आतापर्यंत ५ हजार ६५४ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज उपलब्ध होत असून सिंचन अधिक सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर झाले आहे.

गिरीप्रेमी संस्थेतील ११ महिला गिर्यारोहक मेंटोक कांग्री मोहिमेसाठी पुण्यातून रवाना – सविस्तर बातमी 

जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील १८८, बारामती ६३५, भोर २३, दौंड ६५०, हवेली १८२, इंदापूर ७३८, जुन्नर ४२९, खेड २०१, मावळ १०, मुळशी २२, पुरंदर ५११, शिरूर १,९८४ आणि वेल्हा ११ अशा एकूण ५ हजार ६५४ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाचा लाभ मिळाला आहे.

कर्जमुक्तीची घोषणा, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, सिंचन सुविधा, पीक विमा, बाजारपेठ उपलब्धता आणि सौर कृषीपंप यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शेती अधिक शाश्वत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यावर भर देण्यात येत आहे.

सौर कृषीपंपासाठी अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो, तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के हिस्सा भरून पंप उपलब्ध होतो. उर्वरित ९५ व ९० टक्के रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात संबंधित संस्थेला दिली जाते.

सौर कृषीपंपामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे जंगली श्वापदांचा धोका कमी झाला असून रोहित्र जळणे, कमी व्होल्टेज किंवा वीजपुरवठ्यातील अडचणी यांसारख्या समस्यांपासूनही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. कर्जमुक्तीच्या घोषणेसह अशा पूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे, यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती महावितरण कार्यालयाने दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×