Breking News
राम नदीच्या ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास व्हावा-प्रा. देवेंद्र देशपांडेजेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांनाट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील हडपसरमधील घटनागंजपेठेत भरदिवसा घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज चोरीलापृथ्वीराज माळी यांच्या बहारदार शाहीरीने बोपोडीत रंगली संयुक्त जयंतीची सांस्कृतिक मैफलबालचित्रपट महोत्सवाला ‘क्रांति ज्योती विद्यालय चित्रपटाने सुरुवातबालकाच्या मृत्यूप्रकरणी डाॅक्टरांसह परिचारिकेविरुद्ध गुन्हापुण्यात पीमपी वाहक महिलेवर चाकूने वारअतिक्रमण कारवाई करणाऱ्या निरीक्षकाला धक्काबुक्कीआयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीराला पुण्यात प्रारंभ

“हर घर तिरंगा” अभियानास आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद

“हर घर तिरंगा” अभियानास आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्याधिकारी माधव खांडेकर

marathinews24.com

पुणे – हर घर तिरंगा अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे.

डॉ.आंबेडकर भवन शेजारील जमीन खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय अखेर रद्द – सविस्तर बातमी 

आळंदी शहरात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा व विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रमाचे पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक दोन व चार या शाळां मधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना स्वच्छतेचे महत्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्र. 3 येथे चित्रकला स्पर्धा तसेच तिरंगा राखी मेकिंग स्पर्धा तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त “हस्ताक्षर स्पर्धा व माझे संविधान” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चार मध्ये समूहगीत गायन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश देण्यात आले.“हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत आळंदी शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले, अशी माहिती श्री. खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×