Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

खेळाडूनी अधिकाधिक पदके मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे-हणुमंत पाटील

खेळाडूनी अधिकाधिक पदके मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे-हणुमंत पाटील

राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा बारामतीत संपन्न

marathinews24.com

पुणे – खेळाडुंनी उत्तम खेळ करून राष्ट्रीय स्पर्धेत अधिकाधिक पदके महाराष्ट्राला मिळतील याकरिता प्रयत्नशील रहावे, खेळाडूनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा खेळाव्यात. अतिशय उत्साहाने स्पर्धेला सामोरे जावे. खेळाच्या अनुषंगाने बारामती येथे खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सॉफ्ट टेनिस या खेळाचा आशियाई खेळामध्ये समावेश करण्यात आला आहे. शासनस्तरावर ५ टक्के आरक्षण देखील असल्याने या खेळात अलीकडच्या काळात चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते, असे मत बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी केले.

जग एआयवर नव्हे ज्ञानोबा-तुकोबांच्या मंत्रावर चालेल- विश्वास पाटील – सविस्तर बातमी 

पुणे- सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआय च्या तंत्रावर नव्हे ज्ञानोबा तुकोबांच्या मंत्रावर चालेल. असे विचार ज्येष्ठ लेखक आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

एमकेसीएलचे वरिष्ठ सल्लागार व शास्त्रज्ञ डॉ. विवेक सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे हे यावेळी उपस्थित होते.

विश्वशांतीच्या जीवन कार्यासाठी उपस्थित सर्वांच्या वतीने डॉ. विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. योगगुरू अनंत कोंडे व मारूती पाडेकर गुरूजी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पीस स्टडीज च्या वतीने ‘सेंटर फॉर एक्सेलेन्स इन संस्कृत अँड आयआरएस स्टडीज’ कोर्सच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले, ” शिवाजी महाराजांना जिजाऊंनी विश्वशांतीची प्रेरणा दिली. त्यांच्यावर संतांच्या विचारांचा प्रभाव होता. शक्ती, युक्ती आणि भक्तीचा संगमातून स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्यातून मानवी जातीचे कल्याण केले. म्हणून शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ राजे झाले.”

डॉ. विवेक सावंत म्हणाले, ” विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामधील अद्वैत कल्पना ही आपली संतपरंपरा आहे. ती पुढे नेण्याचे काम डॉ. कराड सरांनी केले.आज बहुविद्याशाखीय शिक्षण व्यवस्थेची गरज असून त्यातूनच भारत आत्मनिर्भर होईल. विद्यार्थ्यांना स्व चा शोध घ्यायला शिकवा. स्व च्या शोधाच्या साधनेतून विश्वशांती प्राप्त होईल.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहेत. ज्ञानोबा तुकोबा टाळकुट्यांचा विषय नाही, हे एक चांगले जीवन जगण्याचे सारं आहे. माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी संतांचाच एकमेव मार्ग आहे. डॉ.आर. एम. चिटणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

क्रीडा युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल पुणे बारामती येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी, बारामती महेश चावले, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष दिपक अरडे, पुणे जिल्हा सॉफ्ट टेनिसचे सचिव विल्सन अँड्रूस,प्रो कबड्डी खेळाडू दादा आव्हाड उपस्थित होते.

विल्सन अँड्रूस यांनी खेळात झालेले बदलाविषयी माहिती दिली. खेळाडूंनी संघभावनेने खेळ खेळावे, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन अँड्रूस यां म्हणाले. लकडे यांनी प्रास्ताविकात राज्याच्या आठ विभागातून ३०० खेळाडूं, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू हे १० ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत देवास मध्यप्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा निवड होणारा संघ सहभागी होणार आहे. यावेळी निवड समिती म्हणून विल्सन अँड्रूस, प्रशांत रणदिवे, विजय पळसकर यांनी काम पाहिले, असेही लकडे म्हणाले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू आयेशा इंगवले या खेळाडूंला सन्मानित करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×