Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

“हर घर तिरंगा” अभियानास आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद

“हर घर तिरंगा” अभियानास आळंदीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्याधिकारी माधव खांडेकर

marathinews24.com

पुणे – हर घर तिरंगा अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांपासून नागरिक, कर्मचारी, महिला बचत गट, विविध संस्था यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे.

डॉ.आंबेडकर भवन शेजारील जमीन खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय अखेर रद्द – सविस्तर बातमी 

आळंदी शहरात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्पर्धा व विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रमाचे पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले. ७ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक दोन व चार या शाळां मधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना स्वच्छतेचे महत्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्र. 3 येथे चित्रकला स्पर्धा तसेच तिरंगा राखी मेकिंग स्पर्धा तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 4 मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त “हस्ताक्षर स्पर्धा व माझे संविधान” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चार मध्ये समूहगीत गायन स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारी यांचे प्रभावी संदेश देण्यात आले.“हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत आळंदी शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले, अशी माहिती श्री. खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×