एक्सप्रेस वेवर गॅस टँकर पलटी झाल्याचा फटका
marathinews24.com
पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या गॅस टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवावर परिणाम झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील १३९ बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
पुण्यात पोलीस आयुक्तांचा दरबार; १५० पोलीस अंमलदारांच्या केल्या विनंती बदल्या – सविस्तर बातमी
एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.





















