Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप

सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप

ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास

marathinews24.com

सोलापूर – राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सोलापूर ते पुणे या २६५ किलोमीटर अंतरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर तब्बल ५ टोल असून देखील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची लाट आहे. जर खड्ड्याची दुरुस्ती केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे बुजवण्यासाठी जाणुन बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.

कोणत्या तरी जिंदादिलाच्या दर्शना आलो इथे..! जिंदादिल शायरीवर ॲड. प्रमोद आडकर यांचे सादरीकरण – सविस्तर बातमी 

देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी एक असलेल्या सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर असा परतीचा प्रवास करताना तब्बल ७५० रुपये टोल आकारला जातो. याशिवाय जीएसटी, मोटार वाहन नोंदणी कर भरल्यानंतर वाहन धारकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. असे असतानाही त्यांना दर्जेदार रस्ता मिळत नाही. अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. दर पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे.

टोल वसुली करूनही रस्त्यांची योग्य देखभाल न केल्याने संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील रस्त्यांसारखे दर्जाहीन महामार्ग बांधले जात असतील तर राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेचा काय उपयोग असा सवाल वाहन चालकांनी विचारला आहे. संपूर्ण २६५ किलोमीटरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा वाहनधारकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×