Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप

सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप

ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास

marathinews24.com

सोलापूर – राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सोलापूर ते पुणे या २६५ किलोमीटर अंतरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर तब्बल ५ टोल असून देखील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची लाट आहे. जर खड्ड्याची दुरुस्ती केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे बुजवण्यासाठी जाणुन बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.

कोणत्या तरी जिंदादिलाच्या दर्शना आलो इथे..! जिंदादिल शायरीवर ॲड. प्रमोद आडकर यांचे सादरीकरण – सविस्तर बातमी 

देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी एक असलेल्या सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर असा परतीचा प्रवास करताना तब्बल ७५० रुपये टोल आकारला जातो. याशिवाय जीएसटी, मोटार वाहन नोंदणी कर भरल्यानंतर वाहन धारकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. असे असतानाही त्यांना दर्जेदार रस्ता मिळत नाही. अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. दर पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे.

टोल वसुली करूनही रस्त्यांची योग्य देखभाल न केल्याने संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील रस्त्यांसारखे दर्जाहीन महामार्ग बांधले जात असतील तर राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेचा काय उपयोग असा सवाल वाहन चालकांनी विचारला आहे. संपूर्ण २६५ किलोमीटरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा वाहनधारकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×