दौंड तालुक्यातील स्वामी-चिंचोलीमधील घटना
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सोसाट्याचा वारा, वादळाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. मुसळधार पावसासह वाऱ्यामुळे दौंड तालुक्यातील स्वामी- चिंचोली गावातील एका शेतकऱ्याचा सोलर पंप थेट विहरीत जाऊन पडला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मोहन काशिनाथ न्हाणे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसासह सोसाट्याचा वाऱ्यामुळे स्वामी चिंचोली गावचे शेतकरी मोहन न्हाने यांच्या गट क्रमांक ५८३ शेतातील सोलर पंप विहरीत जाऊन पडला. ही घटना शुक्रवारी (दि. ६ ) घडली असून, न्हाने यांचे जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित सोलर कंपनी आणि शासनाकडे केली आहे. दरम्यान, यापूर्वी काही दिवसांपासून स्वामी चिंचोली गावात सातत्याने पाऊस होत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीनीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे बांध फुटणे, विविध पिके पाण्यात गेल्याने अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे.
त्यातच सोसाट्याचा वारा, मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना झाडपड, विहरीत गाळ जाणे, पिकांचे नुकसान होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. कुसुम सोलर योजने अंतर्गत मिळालेला 5 एचपी सोलर पंप मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याचा वाऱ्याने विहरीत पडला आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले असून, सोलर पंपाची नुकसान भरपाई मिळावी ही आमची मागणी आहे. मोहन न्हाने, शेतकरी, स्वामी चिंचोली