Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय

सनी निम्हण यांचा निर्धार

marathinews24.com

पुणे – पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. यावेळेच्या सुधारित स्मार्ट विकास टप्प्यावर असले तरी आता उच्च तंत्रज्ञानावर आधारित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाकडे पुढे जाण्याचे ध्येय प्रभाग क्रमांक 8 (औंध-बोपोडी) मधील भारतीय जनता पक्ष-रिपाई युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी ठामपणे व्यक्त केले.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अनुज्ञप्ती व वाहनासंबंधीकामकाजाच्या पूर्वनियोजीत वेळेत बदल – सविस्तर बातमी

हा भाग आता स्मार्ट शहराच्या प्रकल्पातून अनेक सुविधा मिळवत असून या पुढे तो गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञान-आधारित आणि पर्यावरणानुकूल विकासाचे मॉडेल उपनगर म्हणून पुढे नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. औंध – बोपोडी प्रभागात पदयात्रेच्या समारोपानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक औंध येथे सनी निम्हण बोलत होते. यावेळी सहकारी उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, स्विकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे , औंध विश्वस्त मंडळ आणि औंध – बोपोडी भागातील नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना निम्हण म्हणाले, “फक्त प्रशासकीय यंत्रणा पुरेशी नसते — नागरिकांचा सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा आहे.” औंध-बोपोडीतील नागरिकांनी यंत्रणा आणि जनसहभागाचे यशपूर्वक उदाहरण दाखवून देणे महत्वाचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

निम्हण यांनी सांगितले की पुढील योजनांमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार सेवा–सुविधा, वाढत्या स्थानिक सहभागासह प्रशासकीय आणि नागरी शिस्त यावर भर दिला जाईल, ज्यामुळे हा परिसर शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल.

त्यांनी मुळा नदीच्या पात्र आणि घाट परिसराचा पर्यावरणपूरक विकास करण्याची गरज देखील अधोरेखित केली आहे — ज्यामुळे या भागाचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय दीर्घकालीन परिणाम कायम ठेवता येतील. या घोषणेमुळे औंध-बोपोडीमध्ये नागरिकांच्या जीवनमानात वाढ करून पर्यावरणाची सुधारणा आणि सर्वसमावेशक प्रगतीचे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×