March 5, 2026

‘मोगरा फुलला’ उत्सव मॉरिशस येथे यशस्वीरीत्या संपन्न
पुणे

‘मोगरा फुलला’ उत्सव मॉरिशस येथे यशस्वीरीत्या संपन्न

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये मराठी संस्कृतीचा जागतिक उत्सव marathinews24.com पुणे – संतसाहित्यावरील  ‘मोगरा फुलला’ हाभव्य सांस्कृतिक सोहळा […]

सिंहगडावर राजाराम महाराज जयंतीचा जल्लोष
गुन्हेगारी

सिंहगडावर राजाराम महाराज जयंतीचा जल्लोष

छत्रपतींच्या जयघोषात पालखी ; अभिषेक, भजन व्याख्यानातून स्वराज्यभावनेचा जागर marathinews24.com खडकवासला – स्वराज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती राजाराम महाराज यांची तिथीनुसार

खुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक
गुन्हेगारी

जुन्या भांडणातून दोघांवर खुनी हल्ला; चौघांना अटक

धनकवडीतील घटना marathinews24.com पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघांवर खुनी हल्ला केल्याची घटना ३ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीतील

भांडणात मध्यस्थी करणार्‍याला केली मारहाण
ताज्या घडामोडी

भांडणात मध्यस्थी करणार्‍याला केली मारहाण

मार्केटयार्डात घडली घटना marathinews24.com पुणे – भांडणात मध्यस्थी करणार्‍या तरूणाच्या डोक्यात बांबू मारून त्याला गंभीररित्या जखमी केल्याची घटना २ मार्चला

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण
गुन्हेगारी

लोहगावात टोळक्याची दोघांना बेदम मारहाण

लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना ३ मार्चला रात्री

दि.१५ एप्रिल २०२६ *नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी उद्यापासून संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधेयकाचे जोरदार स्वागत; “३० वर्षांची प्रतीक्षा संपली, महिलांना समान संधी मिळणार”* मुंबई.दि.१५: नारी शक्ती वंदन अधिनियम २०२३ (महिला आरक्षण विधेयक) च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर संसदेत उद्यापासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या संदर्भात आज विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘नारी शक्ति वंदन अधिनियम २०२३’ या विषयावर मुंबई येथील पुरंदर निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९९८ मध्ये पाठिंबा न मिळाल्याने हे विधेयक रद्द झाले होते. त्यानंतर २००८ आणि २०१० मध्ये राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यावेळी लोकसभेत विरोधक कागद फाडून टाकत असल्याने ऑनलाइन बिल सादर करण्यात आले. २०१४ मध्ये १५ व्या लोकसभेचा कालावधी संपल्याने ते विधेयक व्यपगत झाले मात्र नवीन लोकसभेत २०२३ मध्ये त्याला पुनर्जीवन मिळाले आणि ते मंजूर झाले.” *जनगणना आणि पुनर्रचनेची सांगड* डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “सध्याच्या विधेयकात जनगणना आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेची तरतूद होती. आता उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात ही अट वगळण्यात येणार आहे. ही १३१ वी घटनादुरुस्ती असेल. लोकसभेत ३५ टक्के आरक्षण निश्चित केले जाईल. त्यामुळे महिलांना किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल, याबाबत स्पष्ट मांडणी केली जाईल.” *स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशस्वी अनुभव* स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. १९९४ पासून अनेक निवडणुका झाल्या. “माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार, प्रत्येक निवडणुकीत अधिक शिक्षित, सक्षम आणि जागरूक लोकप्रतिनिधी निवडून येतात. महाराष्ट्रात ओबीसी, एससी आरक्षणामुळे सर्व घटकांतील महिलांना चांगली संधी मिळाली आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी ‘पतीराज’ या आक्षेपावर स्पष्टीकरण देताना सांगितले, “कुटुंबातील व्यक्ती संवाद साधत असेल किंवा पक्षीय भूमिका घेत असेल, तरी अनेक महिला महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरसेविका स्वतंत्रपणे काम करतात. त्यांची स्वतःची वोट बँक तयार झाली आहे. ठाणे, कल्याणसारख्या ठिकाणी आरक्षण नसतानाही महिलांना सर्वसाधारण जागांवर संधी देण्यात आली आहे.” *आरक्षणाचे महत्त्व आणि विरोधकांना उत्तर* डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “पूर्वी आरक्षणाला ‘पांगळेपणाची खूण’ म्हणून पाहिले जायचे, पण आता ते समान संधीसाठी विशेष संधी म्हणून स्वीकारले जाते. सोशल मीडियामुळे चारित्र्यहनन, कौटुंबिक हिंसा, बदनामी यांची भीती महिलांना राजकारणापासून दूर ठेवते. आरक्षणामुळे राखीव संधी मिळाल्याने ‘महिला रेल्वेच्या राखीव डब्याला जसा अग्रक्रम देतात’ त्या प्रमाणे त्यांना आरक्षणामुळे सुरक्षित वाटेल.” महिला सुरक्षितता, शिक्षण, रोजगार, बचत गटांसोबत पीडित महिलांना भेटणे, कायद्याची अंमलबजावणी, पाणी-विकास-रस्ते-आरोग्य अशा मुद्द्यांवर महिलांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. “जेव्हा स्त्रियांची संख्या वाढते, तेव्हा भाषा बदलते आणि सार्वजनिक वाहतूक, मतदारसंघातील दळणवळण सुरक्षित होण्याकडे लक्ष दिले जाते,” असे त्यांनी नमूद केले. *मतदानात महिलांची वाढती भागीदारी* “महिलांची मतदानाची टक्केवारी तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांत वाढली आहे. त्यांच्यात जागृती वाढत आहे. हे विधेयक राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे,” असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी महायुती सरकारचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एनडीएचे पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांना योग्य सूचना दिल्याचेही त्यांनी नमूद केले. *पंतप्रधान मोदींच्या इच्छाशक्तीचे कौतुक* “१९९६ पासून ३० वर्षे हे बिल अडकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती दाखवली. २०३० पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनुसार ५०-५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व हवे. हे प्रागतिक विधेयक आहे. संपूर्ण भारतातील प्रत्येक घरातील स्त्रीचे लक्ष याकडे आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. असंघटित क्षेत्रातील महिलांच्या जीवनातही बदल घडवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. गोऱ्हे यांनी या विधेयकाचे मनापासून स्वागत केले आणि महाराष्ट्रातील महिला कार्यकर्त्यांसह सर्व महिलांना या संधीचा उपयोग करून सुप्रशासन आणि सुरक्षित समाज घडवण्याचे आवाहन केले. ------
ताज्या घडामोडी

विवाहितांच्या आत्महत्येप्रकरणी कठोर कारवाई करा-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका marathinews24.com मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुलढाणा आणि पुणे

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
पुणे

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण marathinews24.com पुणे – विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले
गुन्हेगारी

बारामतीत तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणारा मध्यस्थ गजाआड

सातबारा उताऱ्यावर नोंदणीसाठी १५ हजारांची लाच marathinews24.com पुणे – बारामतीतील निंबूत कार्यालयातील तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावे शेतकऱ्याकडून १५ हजार

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
गुन्हेगारी

कल्याणीनगरमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकीला धडक marathinews24.com पुणे – दुचाकीस्वाराच्या बेदरकारपणामुळे दुसऱ्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने

error: Content is protected !!
Scroll to Top
×