चऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार

चऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार

सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय चऱ्होली ग्रामस्थांनी घेतला

marathinews24.com

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने चऱ्होलीतील नगर रचना विकास योजना (टीपी स्कीम) रद्द करण्याचा अध्यादेश ३ जून रोजी काढण्यात येईल, असा शब्द दिला होता. मात्र तो शब्द न पाळल्याने चऱ्होली ग्रामस्थांनी आता थांबायचे नाही म्हणत लोकवर्गणीतून ही लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय चऱ्होली ग्रामस्थांनी घेतला आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यलायात समन्वय बैठक – सविस्तर बातमी 

मंगळवारी टी पी स्कीम रद्द झाल्याचा अध्यादेश न निघाल्याने चऱ्होलीतील विठ्ठल मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. चऱ्होलीवर टीपी आणि डीपीचे आरक्षण टाकले आहे. त्याअनुषंगाने विरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी टीपी हटाव, सातबारा बचावचा नारा दिला आहे. ही लढाई लढण्यासाठी लागणारा खर्च कोणा एका-दोघांवर न टाकता तो खर्च लोकवर्गणीतून जमविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. आता जोपर्यंत टीपी रद्दचा निर्णय होणार नाही, तोपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top