Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर sp नवीन आणले. मात्र खालची यंत्रणा जुनीच -आ.रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी घेतली देशमुख कुटुंबींयाची भेट

marathinews24.com

बीड – अनंत जाधव – मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरला होता, मात्र या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे.तरीही याप्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी पोलिसांना सापडत नाही यात बीड पोलीसांचे दुर्दैव असल्याचा संताप मस्साजोग करांनी आमदार रोहित पवार यांच्या समोर व्यक्त केला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवार यांनी मस्साजोग येथे जात दिनांक २९ जूलै रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आणि गावातील नागरिकांची भेट घेतली. यावेळी आमदार रोहित पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना म्हणाले वाल्मीक कराड याला बीड पोलिस vip ट्रिटमेंट देतात त्यामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत चालली आहे याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे,सर्व आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवले पाहिजेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे.पुढे बोलताना म्हणाले वाल्मीक ची गँग अजूनही बाहेर आहे.तीच्यावर कसल्याचं प्रकारचे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही.पीडित कुटुंबांना वाल्मीक कराडच्या गॅंगकडून धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.

वाल्मीक कराड हा आत बसून सूत्र हलवत आहे का? असा सवाल देखील पवार यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पालकमंत्री झाल्यानंतर sp नवीन आणले. मात्र खालची यंत्रणा जुनीच आहे.त्यात अजूनही काही बदल झालेला नाही अनेक लोक प्रशासकीय यंत्रणेत तेच आहेत त्यांच्यात लवकरात लवकर बदल करा आणि देशमुख कुटुंबिंयाना न्याय द्या अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना दिली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख,धनंजय देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×