Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पुणे विमानतळाला पेशव्यांचे नाव देण्याची मागणी 

पुणे विमानतळाला पेशव्यांचे नाव देण्याची मागणी 

‘पेशव्यांच्या पराक्रमाला व्याख्यानातून उजाळा 

marathinews24.com

पुणे – ब्राह्मण महासंघाच्यावतीने ‘पेशवा का नकोत?’ या विषयावर व्याख्याते  सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान  ११ ऑगस्टला रात्री नऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केले होते. व्याख्यानात बोलताना ‘बाजीराव पेशवा यांचे नाव पुणे विमानतळाला  द्यावे’ अशी मागणी सुशील कुलकर्णी यांनी  केली तर बाजीराव पेशवा यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार सुरु करावा, अशी भूमिका  ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली.

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे भक्ती व समाजसेवेचा संगम – सविस्तर बातमी 

कार्यक्रमात सचिन बोधनी,अभय ओरपे, गिरीश गुर्जर यांच्या नेतृत्वात १०० कार्यकर्त्यांनी ब्राह्मण महासंघामधे नुकताच प्रवेश केला होता. त्यांना पदांची जबाबदारी कार्यक्रमात देण्यात आली. मनोज तारे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नितीन शुक्ल यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अनेक विविध क्षेत्रातील तज्ञ यांची ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. सुशील कुलकर्णी यांनी अठराव्या शतकातील हिंदवी स्वराज्याच्या विस्तारातील ऐतिहासिक घटनांचा सखोल आढावा घेतला. विशेषत: पेशव्यांच्या कारकीर्दीतील राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास करत त्यांनी त्या काळातील परिस्थितीचे विश्लेषण मांडले.

कुलकर्णी म्हणाले, बाजीरावांची पेशव्यांची बाजू मांडताना जातीचा उल्लेख महत्वाचा नाही. कर्तृत्वाचा उल्लेख महत्वाचा आहे. पानिपतच्या लढाईनंतर मराठी राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही.लढाया जिंकण्याबरोबर धर्मासाठी, धर्मरक्षणासाठी,धर्मस्थळांसाठी पेशव्यांनी उत्तम काम केले. फक्त, मस्तानीसाठी पेशव्यांचा उल्लेख करणे योग्य नाही. आता पुढील पिढ्यानी पराक्रमासोबत उद्योजकतेची कास धरली पाहिजे. वैभवशाली इतिहास शिकवला पाहिजे’.

आनंद दवे म्हणाले,’आपल्या संघटित प्रयत्नातून दाता आणि शूर पिढी निर्माण केली पाहिजे. पेशवे, सावरकर,फडके यांचा इतिहास विशिष्ट जातीमुळे दुर्लक्षित केला जाऊ नये. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि तरुणवर्ग उपस्थित होता. उपस्थितांनी विषयाची मांडणी आणि सखोल विश्लेषण यांचे कौतुक केले. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की अशा कार्यक्रमांद्वारे इतिहासातील महत्वाच्या पैलूंबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू राहील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×