नागरिकांना १५ मे अखेर स्व-गणना करण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे; या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईनपद्धतीने ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे.
‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य – सविस्तर बातमी
यावेळी जनगणनेच्या अनुषंगाने देशाच्या नियोजनासाठी लागणारी माहिती अचूक भरुया, जनकल्याणासाठी असलेली ही जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून त्यानंतर
१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घरगणना केली जाणार आहे. यामध्ये प्रगणक गृहभेटी देणार असून जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करणार असून यावेळी प्रगणकास सहकार्य करावे.
याकरीता केंद्र शासनाने जनगणना २०२७ करिता https://se.census.gov.in/ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी या संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपल्या कुटुंबाशी निगडित अचूक माहिती भरावी, माहिती भरल्यानंतर एकदा पुन्हा खात्री करूनच ऑनलाईन दाखल करावी, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी केले.
यावेळी पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, पुणे छावणी परिषदेचे सहायक जनगणना अधिकारी शकील मुजावर आदी उपस्थित होते.























