एमएसएमई, टियर–२ शहरांचा विकास व जागतिक स्पर्धात्मकतेला बळ देणारा अर्थसंकल्प
marathinews24.com
पुणे – केंद्रीय अर्थसंकल्पात उद्देशपूर्ण सातत्य दिसून येते. देशाचा विकास केवळ मोठ्या उद्योगांवर नव्हे, तर एमएसएमई, टियर–२ आणि टियर–३ शहरांतील उद्योग व त्यांना पूरक परिसंस्थांवर आधारित आहे, याची स्पष्ट दखल या अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. सार्वजनिक भांडवली खर्चातील वाढ, एमएसएमईसाठी लक्ष्यित वित्तपुरवठा, उच्च-प्रिसिजन टूलरूम्स आणि पारंपरिक औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनामुळे देशाची स्पर्धात्मकता दीर्घकालीन पातळीवर बळकट होईल, अशी प्रतिक्रिया तौरल इंडियाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक भरत गीते यांनी व्यक्त केली.
आरोग्य क्षेत्राला भक्कम बळ देणारा अर्थसंकल्प : डॉ. राजेश देशपांडे – सविस्तर बातमी
एसएमई ग्रोथ फंड, टीआरईडीएसशी संलग्न तरलता आणि सुलभ अनुपालन सहाय्यामुळे उदयोन्मुख उद्योगांना आत्मविश्वासाने विस्तार करता येईल. आजच्या काळात स्पर्धात्मकता ही खर्चापुरती मर्यादित नसून गुणवत्ता, वेळेवर पुरवठा आणि शाश्वततेशी संबंधित आहे. कंटेनर उत्पादन, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता आणि कार्बन कॅप्चरवर दिलेला भर जागतिक पुरवठा साखळीशी सुसंगत आहे. टियर–२ शहरातून येणाऱ्या उद्योजकाच्या नात्याने कौशल्यविकास आणि प्रशासनिक पाठबळाच्या माध्यमातून प्रादेशिक क्षमतेला प्रत्यक्ष कामगिरीत रूपांतरित करण्यावर दिलेला भर महत्त्वाचा आहे. स्वदेशीकरण, रोजगारनिर्मिती आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देतानाच आरोग्य, रेल्वे आणि प्रगत उत्पादन क्षेत्रासाठी भविष्यात अधिक क्षेत्रनिहाय प्रोत्साहनाचा वाव ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे गीते म्हणाले.





















