Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

कॅपेक्स वाढ, वित्तीय शिस्तीवर भर देणारा अर्थसंकल्प; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

कॅपेक्सला प्राधान्य, रोजगारनिर्मितीवर भर; दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप – प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

marathinews24.com

पुणे – केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाला (कॅपेक्स) प्राधान्य देत वित्तीय तूट कमी करण्यावर आणि कर्ज-जीडीपी गुणोत्तर अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून, हा अर्थसंकल्प आर्थिक विकास व वित्तीय शिस्त यांचा समतोल साधणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी रविवारी दिली.

मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा; नव्या नोंदणी भवनाची केली पाहणी – सविस्तर बातमी

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पातून देशांतर्गत उत्पादन वाढवणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि विशेषतः युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरे व ग्रामीण भाग यांचा समतोल विकास साधत सर्वसमावेशक प्रगतीवर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शेती, मच्छीमार व्यवसाय, दुग्धव्यवसाय व अनुषंगिक क्षेत्रांना चालना देतानाच महिलांच्या विकास व सुरक्षिततेसाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. “युवकांची क्षमता वाढवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

संरक्षण साहित्याची देशांतर्गत निर्मिती, अंतर्देशीय जलवाहतूक, रेअर अर्थ मटेरियल कॉरिडॉर, सेमीकंडक्टर्स, सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, बायोफार्मा उपक्रम आणि डेटा सेंटर हब्स ही या अर्थसंकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये असून, यामुळे भारताची दीर्घकालीन आर्थिक पायाभरणी अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नवव्या वर्षी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना, जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक सातत्य आणि स्थिर आर्थिक नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×