Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सोरतापवाडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सोरतापवाडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

स्वच्छता, ग्रामविकास व जन जागृतीबाबत घोषणाबाजी करीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीत आज उत्साहात संपन्न झाला. या अभियानाचे उद्घाटन पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. स्वच्छता, ग्रामविकास व जन जागृतीबाबत घोषणाबाजी करीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानाचा संदेश जन मानसात पोहोचविण्यासाठी आकर्षक चित्ररथाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्याचे जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

अभियानाचे उद्दिष्ट कालावधीत ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षक जालिंदर काकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे, उपक्रम व ग्रामीण विकासासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सहभागी करून विकास कामांना गती द्यावी व सामूहिक प्रयत्नांमुळे पुणे जिल्हा राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्रबिंदू मानून कार्य करण्याचे आवाहन केले. या अभियानातून आदर्श व शाश्वत ग्रामविकासाची दिशा निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास अप्पर आयुक्त (विकास) दीपाली देशपांडे, सहाय्यक आयुक्त (विकास) रविंद्र कणसे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) भुषण जोशी, हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कड यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच विलास चौधरी यांनी केले. आभार रामदास चौधरी यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×