रोहित्राची तोडफोड; २५० किलो तांब्याच्या तारा चोरीला

बाणेर मेट्रो स्थानकाच्या आवारातून केबल चोरीला

लोणीकंद परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन चोरट्यांनी २५० किलो तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना लोणीकंद परिसरात घडली. याबाबत स्वप्नील जालिंदर गायकवाड (वय २९, रा. ऊरळी कांचन,पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाेणीकंद परिसरातील बिवरी गावात नदीकिनारी महावितरणचे रोहित्र आहे. या भागात शेतकऱ्यांनी पंप बसविले आहेत. चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड करुन २५० किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड केल्यानंतर अंतर्गत भागातील ७८० लिटर ऑइल सांडून नुकसान झाले. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर, भोर या तालुक्यांत रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ पोहोचते. रोहित्राची तोडफोड केल्यानंतर चोरटे भंगार माल खरेदी करणाऱ्यांना तांब्याच्या ताराांची विक्री करतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×