पोलिसांनी सापळा लावून चौघा आरोपींना केली अटक
marathinews24.com
पुणे – येरवडा परिसरात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. आकाश राजूसिंग बावरी (वय २८), सोनूसिंग दीपकसिंग बावरी (वय २०), जोगिंदरसिंग जग्गीसिंग बावरी (वय ३८), विनयसिंग विनोदसिंग बावरी (वय २९, चौघे रा. पोते वस्ती, लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. येरवड्यातील छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलावर एकाला मारहाण करुन त्याच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी असा ऐवज लुटून नेण्यात आल्याची घटना घडली होती.
कुख्यात नीलेश घायवळसह कुटूंबियाची बँकखाती गोठावली – सविस्तर बातमी
गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिसांकडून करण्यात येत होता. आराेपी बावरी हे सराइत असून, ते गुन्हा केल्यानंतर परगावी पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे आणि जायभाय यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली साेनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी शिंदे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार,जाधव यांनी ही कामगिरी केली.





















