गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या पुण्यात मनन आश्रमात सरश्री यांचे मार्गदर्शन
marathinews24.com
पुणे – जीवनात प्रेम, आनंद, मौन हीच खरी संपत्ती – सरश्री – प्रत्येकाच्या जीवनात गुरुकृपा होणे हे भाग्याची गोष्ट आहे. आजच्या युगात प्रत्येकाने प्रेम आनंद, मौन या गुणांना आत्मसात करावे हीच खरी मनुष्याची संपत्ती आहे. असे मौलिक विचार नियमचे रचनाकार सरश्री यांनी मांडले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या पुण्यात मनन आश्रमात हॅपी थॉट्सच्या सदस्यांना सरश्री यांचे अनमोल मार्गदर्शन झाले. मायेच्या दुनियेत जगताना आपल्याला अडथळा आणणाऱ्या अनेक घटना घडत असतात.
समाजात त्या घटनांकडे आपण सकारात्मकतेने पहायला शिकले पाहिजे असे सांगत सरश्री यांनी अहंकार जो पर्यंत समाप्त होत नाही. तो पर्यंत जीवन निर्मळ बनत नाही. मानवाच्या कल्याणासाठी सर्वांनी सर्वांसाठी मंगलभावना ठेवावी असेही सरश्री म्हणाले. गुरुपौर्णिमेनिमित्त सरश्री यांचे मार्गदर्शन सदस्यांना अंर्तमुख करणारे आणि आत्म चिंतनास प्रवृत्त करणारे होते. हॅपी शॉट्सच्या साधकांमध्ये हे विशेष मार्गदर्शन नवी ऊर्जा, शांती आणि आध्यात्मिक जाणीव होण्यासाठी प्रेरणादायी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजज्ञान फाऊंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या यांनी केले. या कार्यक्रमास भारतातील विविध राज्यातून सहा हजारच्या पेक्षा जास्त सदस्य उपस्थित होते.





















