Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

जनगणना २०२७ तयारीला वेग; घर यादी गट अचूक नोंदविण्याचे निर्देश

जनगणना २०२७ साठी प्रशासन सज्ज

marathinews24.com

पुणे – आगामी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर घर यादी गट नोंद प्रणालीवरील घर यादी गट नोंदी अचूक ठेवण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत केंद्र सरकारच्या जनगणना संचालनालय, महाराष्ट्र यांच्याकडून पुणे जिल्ह्यासाठी नियुक्त जिल्हा समन्वयक रजत मित्तल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. क्षेत्रस्तरावर मांडणी व भौतिक पडताळणीची कामे अचूकपणे पूर्ण करूनच एच.एल.बी.सी. प्रणालीवर नोंदी कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

जनरल निरीक्षक बिद्यानंद सिंग यांनी घेतला आढावा – सविस्तर बातमी

भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत जनगणना कार्य संचालनालयाने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग दिला असून, पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी व घरगणना’ हे काम १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्यापूर्वी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यंदाच्या जनगणनेत सर्व नोंदवही (ग्रामीण, शहर व चार्ज नोंदवही) डिजिटल प्रणालीद्वारे तयार करण्यात येणार असून, यामध्ये स्थानविषयक माहिती पूर्वभरलेली असणार आहे. चार्ज नोंदवहीमध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कामाचे वाटप, प्रशिक्षण भत्ता व मानधनाची माहिती नोंदविण्यात येणार आहे.

घर यादी गट नोंदणी करताना प्रत्यक्ष क्षेत्रातील स्थिती आणि एच.एल.बी.सी. प्रणालीवरील माहिती यामध्ये शंभर टक्के सुसंगती राखणे अत्यावश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यासाठी सर्व चार्ज अधिकाऱ्यांनी व प्रगणना समन्वयकांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.घर यादी गट निश्चित करताना संबंधित वस्तीची लोकसंख्या किमान ८०० असणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

ग्रामीण भागात तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी हे चार्ज अधिकारी म्हणून काम पाहणार असून, शहरी भागात मुख्याधिकारी किंवा संबंधित आयुक्त ही जबाबदारी पार पाडणार आहेत. सर्व नोंदवही अंतिम करून स्वाक्षरीसह जनगणना संचालनालयाकडे सादर कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×