पतीसह तिघे अटकेत
marathinews24.com
पुणे – कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. ही घटनानुकतीच भवानी पेठेत घडली होती. वैष्णवी उर्फ वर्षा तुषार तुपसौंदर्य (वय २३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुुपसौंदर्य (वय २८) मनोज रोहीदास कांबळे (वय ३९) वनिता मनोज कांबळे (वय ३२) यांना अटक झाली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसानी दिलेल्या महितीनुसार, तुषार रिक्षाचालक असून २८ जानेवारीला कौटुंबिक कारणावरुन त्याचा वैष्णवीशी वाद झाला होता. त्यामुळे त्यानेपत्नी वैष्णवीला बेदम मारहाण केली होती. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती. घटनेनंतर तुषारने घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असताना वैष्णवीचा मृत्यू झाला. याप्रकरणात पतीसह तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.




















