कौटुंबिक वादातून पत्नीचा वार करुन खून

नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावातील घटना

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय १९, रा. बालाजी सोसायटी, शिरसवाडी, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय ३०, रा. बकोरी, ता. हवेली, नगर रस्ता) याला अटक करण्यात आली. शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. बालाजी सोसायटी, शिरसवाडी, वाडेबोल्हाई, नगर रस्ता) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शस्त्राने वार करुन खून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेंद्र आणि त्याची पत्नी नम्रता यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. शैलेंद्रने तिच्याकडे सोन्याचे दागिने मागितले होते. या कारणावरुन त्यांच्यात वााद झाला होता. वादातून गुरुवारी (२२ जानेवारी) शैलेंद्रने रात्री साडेनऊच्या सुमारास नम्रतावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या नम्रताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घटनेची मााहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी शैलेंद्र याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×