Breking News
पोलीस अमलदारानेच उकळली 28 हजारांची खंडणी, सेवेतून निलंबितकामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिकारांजणगाव तिहेरी खूनाच्या तपास फास्ट ट्रॅकवरउद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारनवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबचत गटातील महिलांमार्फत घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वाटपलोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात !चार कोटी खर्च केलेल्या ऍथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापरचऱ्होलीकर सोमवारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणारआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यलायात समन्वय बैठक

पालिकेचा पाणीपुरवठ्यावर उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

पालिकेचा पाणीपुरवठ्यावर उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

खर्च मोठा उत्पन्न कमी अशी स्थिती पाणीपुरवठा विभागाची

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराला दररोज ६३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वर्षाला तब्बल २३० कोटी महापालिका खर्च करते. मात्र पाणीपट्टीतून फक्त ७५ कोटी उत्पन्न महापालिकेला मिळते. त्यामुळे खर्च मोठा उत्पन्न कमी अशी स्थिती पाणीपुरवठा विभागाची आहे. परिणामी दरवर्षी महापालिकेवर आर्थिक बोजा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा? – बिल्डरांच्या हितासाठी हरित टेकड्यांवर ‘रहिवाशी झोन’ – सविस्तर बातमी 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. २०३१ मध्ये लोकसंख्या ५८ लाख ४९ हजार २७४ तर, २०४१ मध्ये शहराची लोकसंख्या १ कोटी ७ लाख ६२ हजार ६६४ इतकी होण्याचा अंदाज आहे. दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. शहराला पवना धरणातून दररोज ५२० एमएलडी, आंद्रा धरणातून ८० एमएलडी आणि एमआयडीसीकडून ३० एमएलडी असा एकूण ६३० एमएलडी पाणी ृपुरवठा केला जातो. शहरात गेल्या साडेपाच वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या अर्ध्या भागास दिवसाला ६३० एमएलडी पाणी दिले जात आहे. सखल भागात आणि शहराच्या सीमेवरील भागांना पाणी योग्य दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी कायम आहे.

महापालिकेकडून पाणी उपसा, शुद्धिकरण, वीजबिल, साठवणूक, पाणी वितरण व्यवस्था, मनुष्यबळ, जलसंपदा विभागाचे पाणी शुल्क आणि यंत्रसामुग्री वजलवाहिनीची देखभाल व दुरुस्ती आदींवर दरवर्षी तब्बल २३० कोटींचा खर्च होतो. तर, पाणी वापरणार्‍या ग्राहकांकडून पाणीपट्टीतून दरवर्षी केवळ ७५ कोटी उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा होते. अनेक ग्राहक नियमितपणे पाणीपट्टी भरत नसल्याचे दिसून येते. परिणामी थकबाकी वाढत आहे. वर्षांचा पाणीपुरवठा विभागाचा जमा व खर्च लक्षाचा हिशोब तपासल्यास तब्बल १५५ कोटींचा आर्थिक भुर्दंड महापालिकेस सहन करावा लागत आहे. हा आर्थिक बोजा दरवर्षी फुगतच चालला आहे. ती तफावत दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून नवीन धोरण आखले जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

२५ ते ३० टक्के पाण्याची गळती

शहरात महापालिकेच्या पिण्याची पाण्याची २५ ते ३० टक्के पाणी गळती होत असल्याचे चित्र आहे. अनधिकृत नळजोड, पाणी चोरी व गळतीमुळे पाणी गळतीचे इतके प्रमाण आहे. त्याला बेहिशोबी पाणी म्हटले जाते. ते प्रमाण कमी करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्मार्ट वॉटर मीटर लावण्यात येत आहेत. तसेच, अंतर्गत भागांसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली जात आहे. त्यावरून पाण्याचा वापर किती होतो, हे स्पष्ट होत आहे.

निगडी, चिखलीत पाणी शुद्धिकरण

पवना धरणातून रावेत येथील पवना नदीवरील बंधार्‍यातून अशुद्ध पाणी उचलले जाते. ते पाणी पंपिंग करून निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धिकरण केंद्रात पाठविले जाते. तेथे पाणी शुद्ध करून शहराला पुरविले जाते. तर, आंद्रा धरणाचे पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधार्‍यावरून उचलून चिखली जलशुद्धिकरण केंद्रात आणले जाते. तेथून शुद्ध केलेले पाणी त्या परिसरातील भागांना पुरविले जाते. पाणी शुद्धिकरणावर महापालिकेचा सर्वांधिक खर्च होतो. एमआयडीसीकडून थेट शुद्ध पाणी जादा दराने विकत घेऊन थेट जलवाहिनीद्वारे वितरीत केले जाते.

तफावत दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न

पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. ती तफावत दूर करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती तसेच, चोरी कमी करण्यासाठी अद्ययावत यंत्रणेचा वापर केला जात आहे. शहरातील जुनी जलवाहिनी बदलून तेथे नव्याने नळजोड दिले जात आहे. अनधिकृत नळजोड दंड भरून अधिकृत करण्यात येत आहेत. पाणी गळती दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाते. पाणीचोरीच्या प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जात आहे. थेट नळ्यास विद्युत मोटार पंप लावून पाणी खेचल्यास पंप जप्त करण्यात येतात, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

दर कमी असल्याने पाण्याची उधळपट्टी

राज्यातील इतर महापालिकेच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाण्याचे दर कमी आहेत. सदनिकाधारकांना एका महिन्यात १ ते ६ हजार लिटर पाणी मोफत आहे. त्यापुढे ६ हजार १ ते १५ हजार लिटरसाठी प्रत्येक १ हजार लिटरसाठी ४ रुपये ९३ पैसे दर आहे. शहरात एकूण १ लाख ८० हजार ३९५ ग्राहक आहेत. अनधिकृत नळजोडचे प्रमाणही मोठे आहे. हाऊसिंग सोसायटीत एक अधिकृत तर, दुसरे अनधिकृत नळजोड असे प्रकार काही ठिकाणी दिसून आले आहेत.

त्यात पाण्याचे दर कमी असल्याने पाण्याचा बेसुमार वापर केला जाते. पिण्याचे पाणी वाहन, पार्किंग, रस्ते, अंगण धुण्यासाठी केले जाते. तसेच, कुंड्या, रोपे व बागेसाठीही पिण्याचे पाणी सर्रासपणे वापरले जाते. नादुरुस्त नळ, टाकी भरून वाहणे, आदल्या दिवशीची पाणी फेकून देणे आदी कारणांमुळे पाण्याची नासाडी होते. दर कमी असल्याने पिण्याच्या पाण्याची उधडपट्टी केली जात असल्याचे शहरातील चित्र आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top