Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

वादळी पावसातील नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

marathinews24.com

बारामती – राज्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे २४ जिल्ह्यात अंदाजे १ लाख ५०० एकराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीने मदत करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

पुणे जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक दिन मोठया उत्साहात साजरा – सविस्तर बातमी

भरणे यांनी आज इंदापूर तालुक्यातील वडापुरी, सुरवड, गणेशवाडी, बावडा, टणू, पिंपरी बु. आणि लाखेवाडी भागात झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाणून पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार जीवन बनसोडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे आदी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, हवामान बदलामुळे आलेल्या राज्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत; बाधित क्षेत्रातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. अशा परिस्थितीत कृषी विभागाने विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी खचून जावू नये, राज्य शासन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, असेही भरणे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळात मंजूरी देण्यात आली आहे; या योजनेचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यापुढे शेतकरी कर्जबजारी होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही भरणे म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×